धाडस

लिहवत नाही

कारण पेटलोच कुठे?

पेटण्यासाठी

’जगलोच’ कुठे?

असं जगण्यासाठी

धाडस असावं लागतं,

ते तरी रुजलंय कुठे?

मग असल्या वांझोटया समाजाला शिलगावीत का नाहीस?

तसं शिलगावण्यासाठीही धाडस लागतं गडया......

Comments

भानस said…
नुसतच धाडस असून भागत नाही गं...
परिणामांना भोगण्याची ताकदही हृदयात हवी...

आवडले.
सखी said…
भानस,
अगं जगणं हा शब्द अवतरणात आला म्हणजेच त्याचा अर्थ बदललाय, ते साधं जगणं नव्हेच.तशा जगण्याचे परिणाम भोगण्यासाठीच धाडस किंवा जिगर लागते.
कोहम said…
majha akhkha blogach dhaDas nasanyachya frustrationvar adahralela ahe.

tujhya daha oLi vachun vaTala me eitake divas itaka ka lihit basalo

:)
सखी said…
लिहिणं बंद केलंत तर मग आम्ही वाचणार काय? :)
धन्यवाद!!!

Popular posts from this blog

अवघे पंढरपूर

देठाफुलाची गोष्ट